आज किती दिवसांनी गावी निघालो आहे . ते गाव जिथ बालपण गेल माझ. किती आठवणी आहेत माझ्या . किती छान दिवस होते ते . जेव्हा गावी होतो . पण म्हणतात ना आयुष्य नेहमी एकसारखच नाही राहत . त्याचाच अनुभव आला . आणि बाबांसोबत तालुक्याच्या गावी जाणं झालं आणि पुढे मग पुण्याला . आजी आजोबा इकडे आले आणि मग कधी गावाला जाणंच झालं नाही .
किती इच्छा होती इथं येण्याची आणि आज ती इच्छा पूर्ण होते आहे . ते शिवार , ती नदी , ती साधी भोळी माणसं आणि .... आणि आरती . काय वेळ होती ती . कधी एक क्षण गेला नाही तिच्याशिवाय . नेहमी तिच्याच सोबत असायचो . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या असण्याशिवाय आपलं पानही हलायचा नाही आणि मध्ये किती दिवस , किती वर्ष अशीच गेली .... तिला न भेटता , तिच्याशी न बोलता , तिला न पाहता . इतके दिवस तर निघून गेले पण आता जेव्हा मी गावापाशी आलो आहे आणि मला माहित आहे ती आता भेटणार आहे . आणि यासाठी काहीच क्षण बाकी आहेत . पण हे क्षणच खूप मोठे वाटू लागले आहेत . आता मात्र धीर धरवत नाही . तिला भेटायला आतुर झालोय .
एकदाच गाव आलं आणि मग इतक्या वर्षांपूर्वी पाहिलेले ओळखीचे , थोडे अनोळखी चेहरे , काहींची ओळख लागत होती तर काही नव्हते आठवत . तिचं घर जस जस जवळ येऊ लागलं तसं काळीज धडधडत होत . तिचे आई बाबा भेटले . मुश्किल वाटलं त्यांना ओळखणं पण शेवटी ओळख लागली . काका शेतावर निघाले होते त्यामुळे ते लगेच गेले . काकुंसोबत गप्पा मारत होतो आणि अचानक कुणीतरी पाठीत जोरदार धपाटा घातला . वळून पाहतो तो समोर आरती .
=========================================================
" हं इकडे कुठे वाट चुकला ? "
ते डोळे , ती बोलण्याची पद्धत ती अजूनही तशीच होती जशी आठवत होती . तिनेही त्याला क्षणात ओळखलं होत . तिला पाहून तर त्याला आनंद झाला होता पण पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे रागही आला होता म्हणून तो म्हणाला
" तू आहेस होय अजून , मला तर लक्षातच नाही आलं कि तू असशील . "
" का तुला काय वाटलं गेले मी ? "
काकूंना समजलं आता यांच्या मध्ये पडण्यात काही अर्थ नाही . म्हणून त्या म्हणाल्या
" तुमचं चालू द्या निवांत मला स्वयंपाक करायचा आहे मी जाते . "
आणि त्या तिथून निघाल्या .
" बघ तुझ्यामुळे काकू गेल्या . " राहुल तिला चिडवत म्हणाला .
" माझ्यामुळे नाही काही ती तुझ्यामुळे गेली . तुलाच लागत ना सारखं भांडायला . " आरतीही काही कमी नव्हती ती फणकाऱ्याने म्हणाली .
" बघा कोण बोलतय ? जिचं जेवण भांडल्याशिवाय पचत नाही ती सांगतेय . " तो तिला तोंड वेडावून म्हणाला .
" गप चिडकू . आठवतंय ना तुला सगळे चिडकू म्हणायचे . " तीही काही कमी नव्हती ती त्याला तोडीस तोड उत्तर देत होती .
" आणि तुला काय म्हणायचे ते आठवतंय ना " आता मात्र तीच बोलणं त्याला लागलं होत आणि तो आपलं महत्वाचं अस्त्र वापरू इच्छित होता .
तिने दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि ती त्याच्याकडे ऍटिट्यूडमध्ये पाहू लागली .
" काय आता नवीन नाव का रखुमाई ? " त्यानं विचारलं .
" हे नाव आवडेल मला . " तिला खरंच ते नाव आवडलं होत .
" आणि ते नावं " तो परत त्या अस्त्राचा वापर करण्याच्या विचारात होता .
ती परत त्याच ऍटिट्यूडमधे त्याच्याकडे पाहत होती त्यामुळे त्याच धाडस झालं नाही तिला त्या नावाने हाक मारायला . त्याने तिला तशी हाक नाही मारली तरी तिला त्याचा राग आला होता . ती निघून जाऊ लागली . तेव्हा तो तिला म्हणाला
" अगं कुठं निघालीस ? "
" काम आहे मला . " असं म्हणत ती घुश्यातच निघाली .
" अगं मी इतक्या दुरून आलो आणि तू निघालीस . " ती निघाली तसा मात्र त्याचा धीर सुटला .
" आलास ते काही मला भेटायला थोडीच आला आहेस . " ती पुढे जात म्हणाली .
" अगं थांब ना . " तो तिला थांबवत होता पण ती गेलीच .
=============================================================
जेवण वगैरे झालं आणि तो जरा फिरायला म्हणून बाहेर पडला . जातानाच आरती भेटली . दोघंही निवांत गप्पा मारत निघाले . दोघांची लहानपणीची एक गोष्ट मात्र तशीच राहिली होती ती म्हणजे कितीही भांडण झाली किंवा काहीही बोलणं झालं तरी त्यांना काही फरक पडायचा नाही . ते पुढच्यावेळी भेटायचे ते अगदी सहज पाठीमागच काही लक्षात न ठेवता . खूप जुन्या आठवणी निघत होत्या दोघेही त्या भूतकाळात रमले होते .
" पण एक सांग तू कस ओळखलस मला ? " आरतीने मधेच त्याला प्रश्न केला .
" त्यात काय तशीच तर आहेस " राहुलनेपण सहजपणे सांगितलं .
" तशीच आहे का मी ? " - आरती
" हो " - राहुल
" छे सगळे म्हणतात किती बदल झाला आहे . " - आरती
" हो बदल तर झाला आहे " - राहुल
" आता म्हणत होता काही बदल नाही आणि आता म्हणतोय बदल झालाय . उगाच आपलं हो मध्ये हो मिळवायचं . " - आरती
"तस नाही ग काही गोष्टी तशाच आहेत आणि काही बदलल्या आहेत . " - राहुल
" हो का मग सांग काय तसंच आहे " - आरती
" तुझे डोळे तसेच नितळ निरागस , तुझी बोलण्याची पद्धत , एव्हढं अधिकारानं कोणी बोलत नाही तुझ्याशिवाय माझ्याशी . आणि ते आवडत मला . " - राहुल
तिला थोडं लाजल्यासारखं वाटत होत तरी तिने त्याला विचारलं .
" आणि बदल काय झाला आहे ? " - आरती
" आता किती सुंदर झाली आहेस " तो तिच्या डोळ्यात डोकावून म्हणाला .
ती लाजली पण ते न दाखवता लटक्या रागाने म्हणाली
" का तेव्हा नव्हते का ? " - आरती
" होतीस ना पण इतकी नाही . " - राहुल
आता मात्र ती लाजली.
" चल तुझं आपलं काहीतरीच . " - आरती
" अगं खरंच आणि हे लाजायला कधीपासून लागलीस . आधी तर नव्हती अशी " - राहुल
" आता किती तरी गोष्टी बदलल्या आहेत पण तुला लक्षात कुठं येत आहेत ? " - आरती
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं . ती नजर चोरून दुसरीकडे पाहू लागली .
" हं खरंच गं माझ्या लक्षातच नाही आलं . " - राहुल
तिला ते सगळं छान वाटत होत पण क्षणात तिला परिस्थितीच भान आलं . तो किती दिवस दूर आहे . तिकडे शहरात किती मॉडर्न लाईफ आणि आपण कुठे . म्हणून ती म्हणाली
" तिकडच्या आयुष्यातून तुला कुठे वेळ मिळणार आहे ? "
" इतक्या सुंदर लोकांसाठी नक्कीच मिळेल कि . " - राहुल
" का ? तिकडे असतील ना पऱ्या " - आरती
हे बोलून ती काहीशी फुरंगटून बसली होती . मग त्याला समजलं आणि तो तिला म्हणाला
" कशाला हवी अगदी परी, पण असावी जरा बरी . आणि तू आहेस ना बरी . "
" मी बरी काय . आता जरी तयार होऊन बाहेर पडले तरी किती मुलांची नजर नाही ढळणार " - आरती
त्याने पटकन तिचा दंड पकडला आणि म्हणाला
" कशाला हवं कोणी ? तू फक्त माझी आहेस . "
तो असं बोलल्यावर ती एकदम बावरली . काय करावं तिला कळेना . पण तशीच स्वतःला सावरत म्हणाली
" आणि हे कधी ठरवलस " - आरती
" मी एकट्याने थोडीच हे ठरवलंय तुलाही हेच वाटत ना . " - राहुल
तिला काय बोलावं हे समजत नव्हतं . किती वेळ ती खालीच पाहत होती . मग तिला कसलीशी आठवण झाली आणि ती म्हणाली
" खोटं सगळं खोटं . असच होत तर मग इतक्या वर्षात तुला माझी आठवण तरी आली का ? "
" तुला सांगू इतके वर्ष तू सोबत नव्हतीस तर ठीक नव्हतं वाटत . सारखी तुझी आठवण येत होती कधी तुला भेटेन असं झालं होत . " - राहुल
" हो का , म्हणून आल्या आल्या माझ्याशी भांडलास का ? " - आरती
" तू पाठीत मारलस म्हणून राग आलेला म्हणून बोललो . पण म्हणून प्रेम नाही कमी झालं . " - राहुल
हे ऐकून मात्र ती लाजून चूर झाली .
" काय ग किती लाजतेय . " - राहुल
ती मान खाली घालून तशीच उभी होती . त्याने हळूच तिची हनुवटी वर केली आणि तिला म्हणाला
" वर बघ ना "
पण ती काही केल्या वर बघत नव्हती
" बघ ना मला तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे " - राहुल
तिने नजर वर केली
" हाये मार डाला " - राहुल
तिने लाजून परत मान वळवली . त्याने तिची मान परत वर करण्याचा प्रयत्न केला तशी ती त्याला धक्का देऊन तिथून सटकली .
" अग थांब तरी " पण ती काही थांबली नाही .
=============================================================
" का गं मघाशी का गेलीस ? " - राहुल
" का गेलीस काय ? काय चाललं होत तुझं . एक तर इतके वर्षांनी आलास आणि आता एकदम हे असं ... " असं म्हणत बोलता बोलता ती थबकली . त्याला जाणवलं तिला थोडं अवघडल्यासारखं होत आहे . तेव्हा तिला थोडं नॉर्मल करण्यासाठी तो म्हणाला
" तुला आठवतंय किती भांडायचो आपण एकमेकांसोबत . "
" मग भांडू का आता तुझ्याशी ? " - आरती
" बघ म्हटलं ना तूच भांडखोर आहेस . " - राहुल
" कोण म्हटलं कि आपण किती भांडायचो ? " - आरती
" अग तेव्हा भांडायचो असं म्हटलो मी . आता भांडूया असं नाही . " - राहुल
" का तुला कंटाळा आला का भांडायचा ? कि घाबरलास मला ? " - आरती
" तस नाही खूप भांडलो कि आता थोडं प्रेम करूया म्हटलं . " - राहुल
ते ऐकून ती थोडी लाजली पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाली
तू कधीपर्यंत आहेस इथे ? "
" आज आहे . उद्या पहाटे परत निघणार . " - राहुल
ती खट्टू झाली आणि म्हणाली
" आणि मग परत कसा भेटणार मला ? "
" अगं भेटू ना आपण असं का म्हणतेस ? " - राहुल
" तेच म्हणतेय कधी ? हे बघ तुझं जग फार वेगळं आहे . इथून गेलास कि परत कधी येशील कधी नाही काही माहित नाही मग हे कशाला ? " - आरती
तो थोडा भावूक झाला आणि म्हणाला
" असं का म्हणते आहेस तुझं नाही का प्रेम माझ्यावर ? "
" असं नाही रे पण या प्रेमाला पुढं काय भविष्य असेल म्हणून म्हणतेय या वाटेवर नको जायला . " - आरती
" हे बघ खरंच जर प्रेम असेल तर रस्ता सापडतो त्याला . " - राहुल
ती काहीच नाही बोलली . मग त्याने परत तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलायला तयार नव्हती . त्याने खूप आर्जव करूनही ती तयार झाली नाही . आणि शेवटी म्हणाली
" जे अशक्य आहे त्या रस्त्यावर नको चालायला . "
एव्हढं बोलून ती निघाली .
त्याने तिला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली
" आता जा तू . आपली मैत्री तेव्हढी लक्षात राहू दे . "
... क्रमशः
किती इच्छा होती इथं येण्याची आणि आज ती इच्छा पूर्ण होते आहे . ते शिवार , ती नदी , ती साधी भोळी माणसं आणि .... आणि आरती . काय वेळ होती ती . कधी एक क्षण गेला नाही तिच्याशिवाय . नेहमी तिच्याच सोबत असायचो . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या असण्याशिवाय आपलं पानही हलायचा नाही आणि मध्ये किती दिवस , किती वर्ष अशीच गेली .... तिला न भेटता , तिच्याशी न बोलता , तिला न पाहता . इतके दिवस तर निघून गेले पण आता जेव्हा मी गावापाशी आलो आहे आणि मला माहित आहे ती आता भेटणार आहे . आणि यासाठी काहीच क्षण बाकी आहेत . पण हे क्षणच खूप मोठे वाटू लागले आहेत . आता मात्र धीर धरवत नाही . तिला भेटायला आतुर झालोय .
एकदाच गाव आलं आणि मग इतक्या वर्षांपूर्वी पाहिलेले ओळखीचे , थोडे अनोळखी चेहरे , काहींची ओळख लागत होती तर काही नव्हते आठवत . तिचं घर जस जस जवळ येऊ लागलं तसं काळीज धडधडत होत . तिचे आई बाबा भेटले . मुश्किल वाटलं त्यांना ओळखणं पण शेवटी ओळख लागली . काका शेतावर निघाले होते त्यामुळे ते लगेच गेले . काकुंसोबत गप्पा मारत होतो आणि अचानक कुणीतरी पाठीत जोरदार धपाटा घातला . वळून पाहतो तो समोर आरती .
=========================================================
" हं इकडे कुठे वाट चुकला ? "
ते डोळे , ती बोलण्याची पद्धत ती अजूनही तशीच होती जशी आठवत होती . तिनेही त्याला क्षणात ओळखलं होत . तिला पाहून तर त्याला आनंद झाला होता पण पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे रागही आला होता म्हणून तो म्हणाला
" तू आहेस होय अजून , मला तर लक्षातच नाही आलं कि तू असशील . "
" का तुला काय वाटलं गेले मी ? "
काकूंना समजलं आता यांच्या मध्ये पडण्यात काही अर्थ नाही . म्हणून त्या म्हणाल्या
" तुमचं चालू द्या निवांत मला स्वयंपाक करायचा आहे मी जाते . "
आणि त्या तिथून निघाल्या .
" बघ तुझ्यामुळे काकू गेल्या . " राहुल तिला चिडवत म्हणाला .
" माझ्यामुळे नाही काही ती तुझ्यामुळे गेली . तुलाच लागत ना सारखं भांडायला . " आरतीही काही कमी नव्हती ती फणकाऱ्याने म्हणाली .
" बघा कोण बोलतय ? जिचं जेवण भांडल्याशिवाय पचत नाही ती सांगतेय . " तो तिला तोंड वेडावून म्हणाला .
" गप चिडकू . आठवतंय ना तुला सगळे चिडकू म्हणायचे . " तीही काही कमी नव्हती ती त्याला तोडीस तोड उत्तर देत होती .
" आणि तुला काय म्हणायचे ते आठवतंय ना " आता मात्र तीच बोलणं त्याला लागलं होत आणि तो आपलं महत्वाचं अस्त्र वापरू इच्छित होता .
तिने दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि ती त्याच्याकडे ऍटिट्यूडमध्ये पाहू लागली .
" काय आता नवीन नाव का रखुमाई ? " त्यानं विचारलं .
" हे नाव आवडेल मला . " तिला खरंच ते नाव आवडलं होत .
" आणि ते नावं " तो परत त्या अस्त्राचा वापर करण्याच्या विचारात होता .
ती परत त्याच ऍटिट्यूडमधे त्याच्याकडे पाहत होती त्यामुळे त्याच धाडस झालं नाही तिला त्या नावाने हाक मारायला . त्याने तिला तशी हाक नाही मारली तरी तिला त्याचा राग आला होता . ती निघून जाऊ लागली . तेव्हा तो तिला म्हणाला
" अगं कुठं निघालीस ? "
" काम आहे मला . " असं म्हणत ती घुश्यातच निघाली .
" अगं मी इतक्या दुरून आलो आणि तू निघालीस . " ती निघाली तसा मात्र त्याचा धीर सुटला .
" आलास ते काही मला भेटायला थोडीच आला आहेस . " ती पुढे जात म्हणाली .
" अगं थांब ना . " तो तिला थांबवत होता पण ती गेलीच .
=============================================================
जेवण वगैरे झालं आणि तो जरा फिरायला म्हणून बाहेर पडला . जातानाच आरती भेटली . दोघंही निवांत गप्पा मारत निघाले . दोघांची लहानपणीची एक गोष्ट मात्र तशीच राहिली होती ती म्हणजे कितीही भांडण झाली किंवा काहीही बोलणं झालं तरी त्यांना काही फरक पडायचा नाही . ते पुढच्यावेळी भेटायचे ते अगदी सहज पाठीमागच काही लक्षात न ठेवता . खूप जुन्या आठवणी निघत होत्या दोघेही त्या भूतकाळात रमले होते .
" पण एक सांग तू कस ओळखलस मला ? " आरतीने मधेच त्याला प्रश्न केला .
" त्यात काय तशीच तर आहेस " राहुलनेपण सहजपणे सांगितलं .
" तशीच आहे का मी ? " - आरती
" हो " - राहुल
" छे सगळे म्हणतात किती बदल झाला आहे . " - आरती
" हो बदल तर झाला आहे " - राहुल
" आता म्हणत होता काही बदल नाही आणि आता म्हणतोय बदल झालाय . उगाच आपलं हो मध्ये हो मिळवायचं . " - आरती
"तस नाही ग काही गोष्टी तशाच आहेत आणि काही बदलल्या आहेत . " - राहुल
" हो का मग सांग काय तसंच आहे " - आरती
" तुझे डोळे तसेच नितळ निरागस , तुझी बोलण्याची पद्धत , एव्हढं अधिकारानं कोणी बोलत नाही तुझ्याशिवाय माझ्याशी . आणि ते आवडत मला . " - राहुल
तिला थोडं लाजल्यासारखं वाटत होत तरी तिने त्याला विचारलं .
" आणि बदल काय झाला आहे ? " - आरती
" आता किती सुंदर झाली आहेस " तो तिच्या डोळ्यात डोकावून म्हणाला .
ती लाजली पण ते न दाखवता लटक्या रागाने म्हणाली
" का तेव्हा नव्हते का ? " - आरती
" होतीस ना पण इतकी नाही . " - राहुल
आता मात्र ती लाजली.
" चल तुझं आपलं काहीतरीच . " - आरती
" अगं खरंच आणि हे लाजायला कधीपासून लागलीस . आधी तर नव्हती अशी " - राहुल
" आता किती तरी गोष्टी बदलल्या आहेत पण तुला लक्षात कुठं येत आहेत ? " - आरती
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं . ती नजर चोरून दुसरीकडे पाहू लागली .
" हं खरंच गं माझ्या लक्षातच नाही आलं . " - राहुल
तिला ते सगळं छान वाटत होत पण क्षणात तिला परिस्थितीच भान आलं . तो किती दिवस दूर आहे . तिकडे शहरात किती मॉडर्न लाईफ आणि आपण कुठे . म्हणून ती म्हणाली
" तिकडच्या आयुष्यातून तुला कुठे वेळ मिळणार आहे ? "
" इतक्या सुंदर लोकांसाठी नक्कीच मिळेल कि . " - राहुल
" का ? तिकडे असतील ना पऱ्या " - आरती
हे बोलून ती काहीशी फुरंगटून बसली होती . मग त्याला समजलं आणि तो तिला म्हणाला
" कशाला हवी अगदी परी, पण असावी जरा बरी . आणि तू आहेस ना बरी . "
" मी बरी काय . आता जरी तयार होऊन बाहेर पडले तरी किती मुलांची नजर नाही ढळणार " - आरती
त्याने पटकन तिचा दंड पकडला आणि म्हणाला
" कशाला हवं कोणी ? तू फक्त माझी आहेस . "
तो असं बोलल्यावर ती एकदम बावरली . काय करावं तिला कळेना . पण तशीच स्वतःला सावरत म्हणाली
" आणि हे कधी ठरवलस " - आरती
" मी एकट्याने थोडीच हे ठरवलंय तुलाही हेच वाटत ना . " - राहुल
तिला काय बोलावं हे समजत नव्हतं . किती वेळ ती खालीच पाहत होती . मग तिला कसलीशी आठवण झाली आणि ती म्हणाली
" खोटं सगळं खोटं . असच होत तर मग इतक्या वर्षात तुला माझी आठवण तरी आली का ? "
" तुला सांगू इतके वर्ष तू सोबत नव्हतीस तर ठीक नव्हतं वाटत . सारखी तुझी आठवण येत होती कधी तुला भेटेन असं झालं होत . " - राहुल
" हो का , म्हणून आल्या आल्या माझ्याशी भांडलास का ? " - आरती
" तू पाठीत मारलस म्हणून राग आलेला म्हणून बोललो . पण म्हणून प्रेम नाही कमी झालं . " - राहुल
हे ऐकून मात्र ती लाजून चूर झाली .
" काय ग किती लाजतेय . " - राहुल
ती मान खाली घालून तशीच उभी होती . त्याने हळूच तिची हनुवटी वर केली आणि तिला म्हणाला
" वर बघ ना "
पण ती काही केल्या वर बघत नव्हती
" बघ ना मला तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे " - राहुल
तिने नजर वर केली
" हाये मार डाला " - राहुल
तिने लाजून परत मान वळवली . त्याने तिची मान परत वर करण्याचा प्रयत्न केला तशी ती त्याला धक्का देऊन तिथून सटकली .
" अग थांब तरी " पण ती काही थांबली नाही .
=============================================================
" का गं मघाशी का गेलीस ? " - राहुल
" का गेलीस काय ? काय चाललं होत तुझं . एक तर इतके वर्षांनी आलास आणि आता एकदम हे असं ... " असं म्हणत बोलता बोलता ती थबकली . त्याला जाणवलं तिला थोडं अवघडल्यासारखं होत आहे . तेव्हा तिला थोडं नॉर्मल करण्यासाठी तो म्हणाला
" तुला आठवतंय किती भांडायचो आपण एकमेकांसोबत . "
" मग भांडू का आता तुझ्याशी ? " - आरती
" बघ म्हटलं ना तूच भांडखोर आहेस . " - राहुल
" कोण म्हटलं कि आपण किती भांडायचो ? " - आरती
" अग तेव्हा भांडायचो असं म्हटलो मी . आता भांडूया असं नाही . " - राहुल
" का तुला कंटाळा आला का भांडायचा ? कि घाबरलास मला ? " - आरती
" तस नाही खूप भांडलो कि आता थोडं प्रेम करूया म्हटलं . " - राहुल
ते ऐकून ती थोडी लाजली पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाली
तू कधीपर्यंत आहेस इथे ? "
" आज आहे . उद्या पहाटे परत निघणार . " - राहुल
ती खट्टू झाली आणि म्हणाली
" आणि मग परत कसा भेटणार मला ? "
" अगं भेटू ना आपण असं का म्हणतेस ? " - राहुल
" तेच म्हणतेय कधी ? हे बघ तुझं जग फार वेगळं आहे . इथून गेलास कि परत कधी येशील कधी नाही काही माहित नाही मग हे कशाला ? " - आरती
तो थोडा भावूक झाला आणि म्हणाला
" असं का म्हणते आहेस तुझं नाही का प्रेम माझ्यावर ? "
" असं नाही रे पण या प्रेमाला पुढं काय भविष्य असेल म्हणून म्हणतेय या वाटेवर नको जायला . " - आरती
" हे बघ खरंच जर प्रेम असेल तर रस्ता सापडतो त्याला . " - राहुल
ती काहीच नाही बोलली . मग त्याने परत तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलायला तयार नव्हती . त्याने खूप आर्जव करूनही ती तयार झाली नाही . आणि शेवटी म्हणाली
" जे अशक्य आहे त्या रस्त्यावर नको चालायला . "
एव्हढं बोलून ती निघाली .
त्याने तिला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली
" आता जा तू . आपली मैत्री तेव्हढी लक्षात राहू दे . "
... क्रमशः